(श्री. वि. ग. कानिटकर यांनी "धर्म सावरकरांचा आणि गांधीजींचा" या पुस्तकात दोघांच्या मतांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. ते मी इथ साभार मांडतो..)
धर्मांची समानता -
स्वा. सावरकर, जात्युच्छेदक निबंध केसरी: १७ जानेवारी 1936
ज्याला जो धर्म प्रिय तो त्याने आचरावा ,ज्यास जो धर्मग्रंथ ईश्वरीय व पवित्र वाटेल त्याने तो मानावा. इतरांनीही तो तो यथाप्रमाण आचरावा . ही सारी शिष्टाचाराची सुभाषिते तंतोतंत पाळण्यास किमान हिंदू तरी केव्हाही अवमान करणार नाही.
ये अपि अन्य देवाता यजन्ते श्रद्धयान्विता: |
ते अपि मामेति कौन्तेय याजान्त्याविधीपूर्वाकाम ||
श्रध्दापूर्वक जे कोणी ,यजिती अन्य दैवते| यजिती तेहि मातेची परी मार्ग सोडूनी|| (गीताई अ.३०९ श्लोक २३), ही शिकवण हिंदूंच्या अत्यंत थोर अशा गीतेसारख्या ग्रंथातच दिली आहे.
परंतु जेव्हा कोणी मुस्लीम व अन्याधार्मीय आपण होऊनच धर्माच्या तुलनेचा प्रश्न काढतील. इतकेच नव्हे तर हिंदू धर्म विषमतेने ओतप्रोत भरलेला असून आमचा मुसलमान धर्म हा माणसामाणसात मानल्या जाणार्या विषमतेपासून
अलिप्त आहे , आमच्या धर्मात सारी माणसे समान मानली जातात, ती एकाच देवाची लेकरे आहेत, अशी प्रकट आव्हाने देऊ लागले तर अशा वेळी त्या आक्षेपांना न खोडता त्या आव्हानास न स्वीकारता "रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति|" अस म्हणून स्वस्थ बसणे म्हणजे शिष्टाचाराचा भंग करणेच होय..निव्वळ भेकडपणा होय.
मुस्लिमांनी धर्मात तत्वत: किंवा व्यवहारात सर्व माणसे समान लेखालेली आहेत. त्यात धार्मिक उच्चनीचता व जन्मजात जातीश्रेष्ठतेला मुळीच वाव नाही ही एक निव्वळ थाप आहे. मुसलमानी धर्मातत्वात नि धर्मव्यवहारात
नुसती विषमता आहे , इतकेच नव्हे तर ती काही प्रसंगी आततायी व असहिष्णू आहे.
मुस्लीम धर्माच्या मूळप्रतीज्ञेमाध्येच जगाचे एकदम दोन तुकडे केलेले आहेत. महम्मदना शेवटचा पूर्ण व खराखुरा पैगंबर मानणारे तेव्हढे मुस्लीम आणि बाकीचे मनुष्यजात काफर! जो मुसलमान तोच स्वर्गात जाणार , काफर तो चिरंतन नरकात ! म्हणजे महाम्माद्ना पैगम्बर मानणे हा माणुसकीचा पहिला गुण !
म्हणजे बुद्ध, कान्फ्युशियास, चीनी - जपानी संत ,ज्ञानेश्वर, तुकाराम ,ख्रिस्त ,वसिष्ठ , व्यास, वाल्मिकी, रोहिदास, नानक यांन्ने महम्मद हाच काय तो शेवटचा पूर्ण व खराखुरा पैगंबर मानला नाही या कारणास्तव ते नरकात पिचत आहेत!
निचातील नीच असला तरी महम्मद साहेबांना मानणारा तो मुसलमान , हा साधुतील साधू काफराहून श्रेष्ठ ! असे कुरानाच्या पानोपानी उद्घोषणा करणारा ,हा धर्म सारी माणसे समान मानणारा धर्म आहे की माणसामाणसात भयंकर आणि असमर्थनीय अशी विषमता फैलावानारा धर्म आहे ?
ही विषमता जितकी कठोर , त्याहूनही मुसलमान राजवटीच्या अनुशासानातील त्याच्या स्म्रुतीनिर्बंधाग्रंथातील विषमता शतपट क्रूर आहे. अनेक मुस्लीम बादशाह आणि मौलावीन्नी जे बाटले नाहीत त्यांच्या कत्तली उडवल्या, जिझिया कर बसवलं, ...महम्मद गझनी ,औरंगजेब यांच्या राजवटी मानवी समतेच्या आणि परम सहिष्णुतेच्या अर्क होत्या की काय ? समता तर सोडाच पण मुस्लिमेतर माणसांना माणसासारखे जगण्याची चोरी करणाऱ्या भयंकर विषमतेच्या आणि आततायी असहिष्णुतेच्या पायी सांडलेल्या हिंदू रक्ताने मुस्लीम राजवतींचे हिंदी इतिहासातले पण अन पण भिजून ओलेचिंब झालेले आहे।
आजही मौलवी महम्मद अली,शौकत आली सारखे अगदी धुतलेले मुस्लीम प्रचाराकाही धड धाडीत म्हणतात की " गांधी कितीही सच्छील असला तो जोवर काफर आहे, तोवर नीचांतील नीच मुसल्मानही मला त्याच्या पेक्षा श्रेष्टच वाटणार. "
(पुढील क्रमश:)
Submitted by: Harshad Samant
No comments:
Post a Comment